मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता चांगलेच वातावरण तापू लागले आहे. कंगनाने थेट संजय राऊत यांचे नाव घेत त्यांनी धमकी दिल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अनेकांनी कंगनावर टीकेची झोड उठवत मुबंईत तुला येऊ देणार नाही असे म्हंटले होते. आता किस के बाप मे हिम्मत है तो रोख लो . . मी मुंबईमध्ये येणार आहे. असे ट्विट कंगनाने केले आहे.
कंगनाने मुंबईबाबत वक्तव्य केल्यानंतर नेटकऱ्यानी देखील कंगनाला टार्गेट केले होते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना मुंबईत आली तर तिचे थोबाड फोडल्याशिवाय आमच्या रण रागिणी राहणार नाहीत अशा आशयाचे ट्विट केले होते. मात्र आता कंगनाने सर्वांना आव्हान देत मी मुंबईत येणार असल्याचे म्हंटले आहे.
काय म्हटलंय कंगनाने नेमकं आपल्या ट्विटमध्ये
अनेकांनी मला धमकी दिली आहे कि मुंबईत परत येऊ नकोस,
तर अशा व्यक्तींना मी सांगू इच्छिते की मी ९ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये येणार आहे.
मी मुंबईत लँड होण्याची वेळ देखील सांगेल,कोणाच्या बापामध्ये हिम्मत असेल तर अडवून दाखवा.
अशा आशयाचे ट्विट करत कंगनाने एक प्रकारे शिवसेनेला आव्हानच दिले आहे. शिवसेना आणि कंगणामधील संघर्ष आता किती ताणला जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le 🙂 https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020