औरंगाबाद : वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण मिटत नाही तोच पुन्हा एकदा नानांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आहे की “ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं” असं देखील वक्तव्य केलं होतं. यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलीआहे .
“बेटी बचाओ बेटी पटाओ” म्हणणाऱ्याचे पुतळे जाळणार का? नाना पटोलेंचा भाजपला रोखठोक सवाल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले हे एखाद्या दारुड्या माणसासारखे वक्तव्य करतात असं देखील म्हटलं होतं. तर औरंगाबाद शहराचे भाजपचे अध्यक्ष संजय केणेकर यांनी थेट नाना पटोलेंना कपडे फ़ाटूपर्यंत मारू असा सज्जड दम भरला आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने गरळ ओकण्याचे काम करत आहेत. नरेंद्र मोदी हे फक्त पंतप्रधानच नाही तर देशातील १३५ कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. त्यामुळे नाना हे देशातील १३५ कोटी जनतेचा अपमान करत आहेत.
नागपूरात स्टेजवर न्यूड डान्स, आर आर आबांच्या स्वप्नांना ठाकरे सरकारकडून तिलांजली – चित्रा वाघ
जर ते औरंगाबाद शहरात आले तर त्यांना कपडे फाटेपर्यंत मारू असा दम भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी भरला आहे. औरंगाबादेत शहरात भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात क्रांतीचौकात नाना पटोलेंच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. नाना पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारत तो जाळण्याचा प्रयत्न देखील झाला. पोलीसांनी सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी संजय केणेकर यांनी नाना पटोले यांना शहरात येवूनच दाखवा असे आव्हान दिले. केणेकर म्हणाले, नाना पटोले यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येते.
Read also:
- नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
- शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस
- नाना पटोलेंच्या फोटोला भाजपने पाजलं गोमूत्र; प्रसाद लाड म्हणतात… नानांच शुद्धीकरण करणं गरजेचं…
- “इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
- बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? देवेंद्र फडणवीस संतापले