मुंबई : वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण मिटत नाही तोच पुन्हा एकदा नानांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आहे की “ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं” असं देखील वक्तव्य केलं होतं.
मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय
यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नाना पटोले हे एखाद्या दारुड्या माणसासारखे वक्तव्य करतात असं देखील म्हटलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. मी एका गावगुंडांबद्दल मागील काही दिवसांमध्ये वक्तव्य केलं होतं. मात्र महाराष्ट्र भाजपकडून वारंवार ते वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जोडले जात आहेत. वारंवार भाजपकडून माझ्यावर टीका केली जात आहे, माझ्याविरोधात आंदोलने केली जात आहेत.
‘बारदेझचा बादशाह’ होण्याची महत्त्वाकांक्षामुळे मायकल लोबो यांना धोक्याची घंटा!
ज्या भारतामध्ये शेतकऱ्यांनी १ वर्षांसाठी आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांना एक केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांना त्याच्या गाडीखाली चिरडून ठार करतो. देशात अनागोंदी माजली आहे. बेटी बचाओ बेटी पटाओ अशी वक्तव्य होत असताना भाजप शांत आहे. तिथे तुम्ही पुतळे का जाळत नाही असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. राज्यभर आज माझे पुतळे जाळले जात आहेत. मात्र त्यांच्या चुकांबद्दल ते पुतळे जाळण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना एकप्रकारे वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातील भाजप याला खतपाणी घालत आहे. देशातील पंतप्रधानांची गरिमा घालवण्याचं काम महाराष्ट्र भाजप करत आहे.
ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं; नाना पटोलेंची जीभ पुन्हा घसरली
गावगुंडांबद्दल बोलणं चुकीचं नाही. मी एका गावगुंडांबद्दल बोल्लो आणि तरीही भाजप मला विरोध करत आहे. काँग्रेस नेहमीच झुंडशाहीला विरोध करतो आणि करत राहणारच. त्या गावगुंडाने सर्वांच्या समोर येऊन काही वक्तव्ये केली आहेत आणि त्यानुसारच मी बोललो आहे असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
Read also:
- भाजपाने ज्या-ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला – नवाब मलिक
- पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
- हे तर भाजपाबद्दलची मळमळ, जळजळ व्यक्त करणार दिशाहीन असं पकाऊ भाषण!
- लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली; कांदोळकरांचा घणाघात
- संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून काळजीवाहू विरोधकांना उत्तर देणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा एल्गार