नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते.
माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
भंडारा जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा प्रचार सुरु होता. यावेळी एका प्रचारसभेला संबोधित करत असताना नाना पटोले यांनी थेट मोदींना मारायची भाषा केली. मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला होता आणि तो मोदी म्हणजे एक गावगुंड अशी सारवासारव नाना पटोलेंनी त्यावेळी केली होती.
माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
मागील वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण मिटत नाही तोच पुन्हा एकदा नानांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आहे की “ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं”. आता या वक्तव्यनानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे; गोव्यात संजय राऊतांचा हल्लाबोल
सध्या नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पटोले यांना बोलावण्यात आले होते.
सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले? चंद्रकांत पाटलांचा सवाल
यावेळी पटोलेंनी देशात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. देशाचे मूळ मुद्दे बाजूला सारले जात आहेत. बेरोजगारांचा देश म्हणून सध्या भारताची जगाच्या पाठीवर ओळख झाली आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांचे प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. देशातील केंद्र सरकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Read also:
- ‘बारदेझचा बादशाह’ होण्याची महत्त्वाकांक्षामुळे मायकल लोबो यांना धोक्याची घंटा!
- मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय
- आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
- ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
- उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस