मुंबई : शिरूर लोकसभाक्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे यांनी मागील काही काळात एका चित्रपटामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच वाद पेटल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे तर काहींनी त्यांना थेट विरोध केला आहे. याच वादावर काल पडदा टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक
एक कलाकार म्हणून खासदार अमोल कोल्हे यांनी मथुराम गोडसेंची भूमिका साकारली होती. ज्यावेळी त्यांनी ही भूमिका साकारली होती तेव्हा ना लोकप्रतिनिधी होते ना कोणत्याही पक्षात होते. एक कलाकार म्हणून ज्याला त्याला त्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. त्यामुळे कोल्हेंच्या भूमिकेला शरद पवारांनी देखील समर्थन केले असल्याचे चित्र काल समोर आले.
पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतरही खासदार अमोल कोल्हेंना विरोध केला आहे. नथुराम गोडसे हा सबंध महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. तो उभ्या आयुष्यात पुसता येणार नाही. जेव्हा – जेव्हा नथुरामाचे नाव निघेल तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राचे नाव निघेल. त्या डागाला आपण आणखी गडद कसा होतोय हे पाहणं, हे महाराष्ट्रात होताच कामा नये.
मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर; मार्चमध्ये होणार मतदान?
खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माझं बोलणं झालं आहे. त्यांनी मला समजावलं की हे २०१७ मध्ये झालेले शुटिंग आहे, तेव्हा मी त्यात काम केले होते. पण मी देखील त्यांना स्पष्टचं सांगितले की मी माझी भूमिका बदलणार नाही. मी शरद पोक्षेंना विरोध केला आहे, विनय आपटेला विरोध केला, असे आपण कोल्हे यांना स्पष्ट केले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
Read also:
- ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
- उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
- सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- उत्पल पर्रिकरांचं अखेर ठरलं; पणजीतून अपक्ष लढणार निवडणूक, भाजपचा शब्द डावलला
- मुंबई महापालिकेचं राजकारण पेटलं; शिवसेना- भाजपचे नगरसेवक आमने-सामने भिडले