पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारणाला ऊत आलेला दिसत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी एकमेकांच्या विरोधात बंड पुकारले आहे.
मुंबई महापालिकेचं राजकारण पेटलं; शिवसेना- भाजपचे नगरसेवक आमने-सामने भिडले
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने दिग्ग्ज नेत्यांना उमेदवारी नाकारून पक्षाशी कट्टर असणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामध्ये भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना थेट उमेदवारी नाकारली आहे.
उत्पल पर्रिकरांचं अखेर ठरलं; पणजीतून अपक्ष लढणार निवडणूक, भाजपचा शब्द डावलला
तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने उत्पल पर्रीकर यांना पणजीतून न लढता दुसऱ्या दोन जागांवरून लढावे असा सल्ला दिला होता. मात्र भाजपची ऑफर नाकारून त्यांनी अपक्ष उभे राहणे पसंद केले आहे. यावरून शिवसेनेने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारून त्यांचा अपमान केला आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांचा केलेला हा अपमान गोवेकर विसरणार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले? चंद्रकांत पाटलांचा सवाल
डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. भाजपाचे नेते म्हणत आहेत की गोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट वाचणार नाही. १९८९ पासून भाजप गोव्यात काम करतोय आणि सलग दोन निवडणुकात त्यांचे डिपॉझिट गेले होते. डिपॉझिट गेले म्हणून निवडणुका लढायच्याच नाहीत असं कुठंही लिहलेलं नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि तो आम्ही गोव्यात करत आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
- मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय
- आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
- ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
- उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस