पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. परंतु पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे जलतरण तलाव सुरु राहणार आहेत. पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर; मार्चमध्ये होणार मतदान?
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दर्शवला. त्यानंतर पालकमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली. यामध्ये महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचं राजकारण पेटलं; शिवसेना- भाजपचे नगरसेवक आमने-सामने भिडले
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली.
Read also:
- आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
- ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
- उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
- सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- उत्पल पर्रिकरांचं अखेर ठरलं; पणजीतून अपक्ष लढणार निवडणूक, भाजपचा शब्द डावलला