मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारपणामुळे बाहेर पडले नव्हते. हिवाळी अधिवेशनापासून तर कित्येक महत्वाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावलेली नव्हती. यावरून विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.
डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे; गोव्यात संजय राऊतांचा हल्लाबोल
आता काल हिंदुहृदयसम्राट,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही आपले ठाकरे बाण चालवले आहेत. अनेक दिवसांनंतर आपण भेटलो आहोत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपण भेटलो होतो. त्यानंतर लगेचच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. दिवाळीच्या वेळी राज्यात दौरा करायची खूप इच्छा होती, मात्र मानेच्या दुखणेने सगळं नियोजन फिस्कटलं.
सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले? चंद्रकांत पाटलांचा सवाल
आता सर्वांच्या प्रेमामुळं मी अगदी ठणठणीत बरा झालो आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या महाभयंकर लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जर एखदा विषाणू एकामागून एक लाटा आणू शकत असेल तर आपल्याकडे प्रचंड तेजस्वी भगव्याचा वारसा आहे,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आता मी बरा झालो आहे आणि लवकरात लवकर महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे. जसं आपण बघतो की काळजीवाहू सरकार असतं तसंच काळजीवाहू विरोधक देखील असतात.
उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
आपण ज्या मित्रपक्षाला मागील २५ वर्षांत पोसले त्यामुळे युतीत आपली २५ वर्ष सडण्यात आली. आजही मी या वक्तव्यावर ठाम आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे, राजकारण म्हणजे गजकरण आहे, जेवढं खाजवावं तेवढी खाज आहे. हे राजकारणातले गजकरणी आहेत. ते राजकारण म्हणून काहीही खाजवतायत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Read also:
- ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं; नाना पटोलेंची जीभ पुन्हा घसरली
- ‘बारदेझचा बादशाह’ होण्याची महत्त्वाकांक्षामुळे मायकल लोबो यांना धोक्याची घंटा!
- मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय
- आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
- ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी