मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारपणामुळे बाहेर पडले नव्हते. हिवाळी अधिवेशनापासून तर कित्येक महत्वाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावलेली नव्हती. यावरून विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आता काल हिंदुहृदयसम्राट,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही आपले ठाकरे बाण चालवले आहेत.
उत्पलने पणजीसाठी हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विरोधकांवर टीका करताना म्हटलं होतं की ते तर काळजीवाहू विरोधक आहे. त्यांच्यामुळे आम्ही युतीमध्ये २५ वर्ष सडलो अशी जहरी टीका केली होती. याला आता आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला नाव न घेता उत्तर दिले आहे.
ठाकरे सरकारचे संपुर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
नेहमीप्रमाणे भाजपा बद्दलची मळमळ, जळजळ आणि कोहीती दिशा-धोरण नसलेले पकाऊ भाषण , असं ट्विट आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.एवढंच नाही तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वाने कोणतीही आदरांजली वाहिली नाही किंवा काही ट्विटही केलं नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे.
आता काय लोकांच्या घरात जावून टिव्ही फोडू का? खासदार कोल्हेंच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
पोकळ स्वाभीमान आणि बोगस हिंदुत्त्वाबद्दल बाता करणाऱ्यांना दिल्लीच्या मालकाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यंदाही आदरांजली व्यक्त न करता फाट्यावर मारले आहे. हाच यांचा कणा नसलेला बाणा”, असंही भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता शिवसेनेकडून याला काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली; कांदोळकरांचा घणाघात
- संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून काळजीवाहू विरोधकांना उत्तर देणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा एल्गार
- ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं; नाना पटोलेंची जीभ पुन्हा घसरली
- ‘बारदेझचा बादशाह’ होण्याची महत्त्वाकांक्षामुळे मायकल लोबो यांना धोक्याची घंटा!
- मोठी बातमी: पुण्यातील शाळा बंदच राहणार; अजित पवारांच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय