सातारा: साताराकराचा पाणी प्रश्नाने नेहमीच लक्ष केंद्रीत केले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यापासून ते वाढीव निधी मिळवून देईपर्यंतचा पाठपुरावा केला आहे. तसेच त्यांनी या प्रकल्पस्थळी भेट देऊन स्वता: कामाची पाहणी केली. कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम लवकर पूर्ण करावे, व सातारकराचा पाणी प्रश्न लकरात लवकर मार्गी लावा, अशा सुचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
कास धरणाचे काम १८८५ रोजी सातारा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी करण्यात आले होते. दिवसेंनदिवस शहराची लोकसंख्येत वाढ होत गेल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाचे पाणी कमी पडत असल्याने आमदारशिवेंद्रराजे यांनी कास धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने आमदार शिवेंद्रहराजे यांच्या मागणीला २०२१ मध्या हिरवा कंदली दाखवला आहे. त्यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून या प्रकल्पाला ४२ कोटी रुपायाचा असा भरघोस निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मजुर करुन दिली आहे. काही दिवासानी वाढीव निधी अभावी कास प्रकल्पाचे काम रखडले होते. पुन्हा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून वाढीव निधीला प्रशासकीय मान्यता मिळवली, तसेच ५८ कोटी रुपये वाढीव निधीही मंजूर करून घेतला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची पालिकेत सत्ता नसतानाही सातारकरांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी सुटावा यासाठी निधीअभावी रखडलेले काम पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे. कास धरणाची उंची १२.४२ मीटर वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उंची वाढवल्यानंतर या धरणात ५०० दलघन फूट पाणीसाठा होणार आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी आज सकाळी या प्रकल्पाची पाहणी केली.