पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. वेगवेगळ्या गोष्टींमुळे ते कायम चर्चेत राहत आहेत. तसेच त्यांच्याकडे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. सभासद नोंदणीसाठी ते बारामती दौऱ्यावर जात आहेत. अशातच आज पुण्यातील चारचाकी वाहनचालकांना त्यांनी विनंती केली आहे.
“भाजपसोबत युती म्हणजे दो दिनकी चांदी फिर अंधेरी रात”
नॅन्सी लेक होम समोरून जो रस्ता खाली बिबवेवाडी अप्पर भागाकडे जातो. तो पुढे लेक टाऊन चौकात येतो. मात्र तिथे ओढ्यावर जो पुल आहे. त्या पुलावर रस्ता अरूंद आणि एकदम छोटा आहे. मागील 20 वर्षापासून हा रस्ता वाहतुकीसाठी प्रचंड त्रासदायक झाला. यावेळी वसंत मोरे यांनी ओढ्यावरील पुल सरळ आणि मोठा करण्यासाठी काम हाती घेतलं आहे. त्यावेळी त्यांनी अजून थोडा वेळ लागेल पण कायमचा त्रास निघून जाईल. चारचाकी वाहनचालकांना विनंती आहे. आणखी काही दिवस या रस्त्याचा वापर टाळावा व दुचाकी आणि रिक्षावाल्यांनी वाहने सुरक्षित आणि सावकाश चालवावीत असं आवाहन त्यांनी केलं आहे.
“संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे”; भाजपची मागणी
पुण्यात वाहतुक समस्या ही बेतातीच ठरली आहे. सातत्याने पुण्यातील नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच वसंत मोरे यांनी हे काम हाती घेतलं आहे. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मुंबई बंगलोर महामार्गावर अ़डकले होते. पुण्यातील चांदणी चौकात होणारी गर्दी पाहता त्यांनी पाहणी दौरा केला होता. एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील चांदणी चौकात प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना वाहतुक कोंडीतून मार्ग काढण्याच्या सुचना दिल्या.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे ग्रामीण-मावळ, शिरूर आणि बारामती मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरिक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. यामध्ये किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते यांना मावळ लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजय शिंदे, आणि बाळा शेडगे यांनी शिरूर लोकसभा तर वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
Read also
- “शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
- “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
- भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार
- “टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचीही चौकशी व्हावी”; शिवसेनेची मागणी
- “शिवतीर्थवर होणारा ‘दसरा मेळावा’ म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे”