मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. काल रात्री भाजपचे नेते ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी देखील राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. यामुळे मनसे भाजपसोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर “युती म्हणजे दो दिनकी चांदी फिर अंधेरी रात है”, असा सल्ला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे.
“राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही”; गुलाब नबी आझाद
भाजप हा राष्ट्रीय पक्ष हा प्रादेशिक पक्षासोबत युती करतो आणि त्याच प्रदेशिक पक्षाला संपवतो हे जग जाहीर आहे. याच भाजपने आसाममध्ये आसाम गण परिषदेसोबत युती केली आणि त्यांना भाजपने संपवलं. नंतर पंजाबमध्ये अकाली दलासोबत युती केली आणि त्यांना संपवलं. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसोबत युती केली आणि त्या पक्षालाही भाजपने संपवले.
“राष्ट्रवादीकडे अनेक जण आकर्षित, काही राज्यात भाजपची सत्ता गेलीय, त्यामुळे जोमाने काम करा”
बिहारमध्ये नितीश कुमार यांची भाजपसोबत युती होती. त्यांना कळालं की हा पक्ष जेडीयुला संपवत आहे म्हणुन ते सुद्धा या युतीतुन बाहेर पडले. त्यासोबतच महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्याचा व शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण उद्धव ठाकरे त्यांच्या नितीला बळी पडले नाहीत. परंतु राज ठाकरे तुम्ही भाजपसोबत युती केल्याने तुमचे 2 ते 4 नगरसेवक निवडून येतील. परंतु युती म्हणजे दो दिनकी चांदी फिर अंधेरी रात है हे आपण लक्षात ठेवावं, असं आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले.
Read also
- “संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे”; भाजपची मागणी
- “देशात मोदी लाट ओसरली”
- “मी विकेट घेत नाही मी बॅटींग करणारा नेता आहे, चौकार षटकार कसा मारायचा मला चांगलं माहित आहे”
- “बाळासाहेबांना म्हातारं, अन् उद्धव ठाकरे म्हणजे शिमग्यातला गोमू म्हटलं, त्याला नेतेपद”
- “पंकजा मुंडेंबद्दल बाेलावे एवढी अमोल मिटकरींची उंची तरी आहे काय?”; भाजपचा मिटकरींना सवाल