मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वर्धा जिल्हा पक्ष कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. पक्ष सभासद नोंदणी उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडा यामुळे मोठ्या प्रमाणात नोंदणी होईल. जिल्हास्तरीय संघटना व प्रदेश संघटनेच्या प्रत्येक माणसाने यात सहभागी व्हावे. आपण जर प्रयत्न केले तर ही नोंदणी चांगल्यापद्धतीने होईल आणि पक्षाला कार्यकर्त्यांचा चांगला संच मिळेल. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले वातावरण निर्माण करता येईल, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.
चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक जण आकर्षित होत आहेत. त्यामुळे पक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे स्वागत करा. आपला पक्ष वाढत आहे, तो अधिक वाढायला हवा यासाठी प्रयत्न करा. पक्ष वाढविण्यासाठी जो काम करेल त्याच माणसाला पुढे आणण्याचे काम करा, अशी सूचना त्यांनी केली. आपली वैचारिक लढाई ही भाजपशी आहे. त्यामुळे विविध सेलच्या माध्यमातून आपले संघटन वाढवण्याची गरज आहे. भाजपची सत्ता देशभर नसून काही राज्यात त्यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे न डगमगता आपला लढा उभारा, आपल्याला जिल्ह्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, माजी खासदार सुबोध मोहिते, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण सोनावणे, खलील खतीब, प्रविण कुंटे पाटील आदी उपस्थित होते.
Read also
- “पुन्हा मंत्रिपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल”; गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादीचा टोला
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज
- “गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
- “विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी