पुणे : मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर पानटपरी ते मंत्री असा जो गुलाबराव पाटील यांचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.
“तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
मंत्री गुलाबराव पाटील हे मुळात पानाला चुना लावणारे आहेत. कुठल्याही व्यवसाय वाईट नसतो. परंतू पानटपरी ते मंत्री असा प्रवास केलेल्या गुलाबराव पाटील यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही. आपण कोणत्या कार्यक्रमात कुठले उदाहरण देत आहोत. याचे भान मंत्र्यानी ठेवले पाहिजे. मात्र या गद्दारांना कोणतेही धोरण नाही. स्त्री-रोग तज्ज्ञ हातपाय नको बघू देत. पण येणाऱ्या काळात तुम्हाला परत मंत्रीपदापासून ते पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल, असा इशारा रूपाली पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना दिला आहे.
“रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
काय उदाहण देताय, काय आदर्श ठेवताय, अक्षरश: लाजीरावणी गोष्ठ आहे. अशी अडाणी माणसे घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालणार आहात का, असा सवाल करत. हे लोक सतत आपल्या वाक्यातून, कृतीतून सतत महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. असा लोकांपासून खरेच महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे, असंही रूपाली पाठील म्हणाल्या.
“कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
गुलाबराव पाटील व इतर गद्दार मोठे कर्तृत्व गाजवल्याच्या थाटात भाषण करू नका असा समज विद्या चव्हाण यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे. तसेच स्त्रीरोग तज्ञ बायको नांदत नाही. आपल्या जन्मदात्या आईची आणि बायकोची बहिणीची आठवण असू द्या. असं म्हणत आणि असली तर महिलांचा जाहीर माफी मागा, असं देखील विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. डॉक्टरांचे डोके एका फॅकल्टीचे असते. मात्र आम्ही जनरल फिजिशियन आहोत. बायको नांदत नाही, तो पण माणूस आमच्याकडे येतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
Read also
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज
- “गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
- “विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
- चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती