मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेच्याविरोधात बंड केला. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केले. मात्र यानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे सातत्याने एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. यावरून आता भाजपकडून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
“जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज
भास्कर जाधव यांचं ठाकरे प्रेम सध्या अधिकच वाहू लागलं आहे. गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही. आम्हाला चांगलं माहित आहे, म्हणून जास्त उडू नका, असं ट्विट करत भाजपनेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना इशारा देत टोला देखील लगावला आहे. तसेच ज्या भास्कर जाधवांनी बाळासाहेबांना हे म्हातारं म्हणून अनेक भाषणं केली. आदित्य ठाकरेच्या चेपलेल्या आवाजाची नक्कल केली आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिमग्यातला गोमू, हे म्हणणाऱ्या भास्कर जाधवला नेतेपद दिल्यामुळे उद्धव ठाकरे राजकारणात किती असहाय्य झाले आहेत लक्षात येतं असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
“गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
सोबतच, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी केली. या युतीवरून भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यावरून, उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्रमंडळ सोबत सुद्धा युती करतील, असा टोला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून भाजपनेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
सोबतच, शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे. छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रसाठी हौतात्म्य पत्कारले. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढक राहिला व जिंकला. आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हिही जिंकू. नक्कीच जिंकू ! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा !, असं सामनातुन म्हटलं आहे.
ज्या भास्कर जाधवनी स्व. बाळासाहेबांना ‘हे म्हातारं’ म्हणून अनेक भाषणं केली, आदित्यच्या चेपलेल्या आवाजाची नक्कल केली आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिमग्यातला गोमू, हे म्हणणाऱ्या भास्कर जाधवला नेतेपद दिल्यामुळे उद्धव ठाकरे राजकारणात किती असहाय्य झाले आहेत लक्षात येतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 29, 2022
Read also
- “पंकजा मुंडेंबद्दल बाेलावे एवढी अमोल मिटकरींची उंची तरी आहे काय?”; भाजपचा मिटकरींना सवाल
- “राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही”; गुलाब नबी आझाद
- “राष्ट्रवादीकडे अनेक जण आकर्षित, काही राज्यात भाजपची सत्ता गेलीय, त्यामुळे जोमाने काम करा”
- “पुन्हा मंत्रिपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल”; गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादीचा टोला
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”