मुंबई : गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही पाऊले उचलावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
“गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
भाजपा नेत्या पंकजा मुंडेंबद्दल बाेलावे एवढी अमोल मिटकरींची उंची तरी आहे काय? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अमोल मिटकरी यांना केला आहे. तर पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या कुठेही जाणार नाहीत, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मनाचे मांडे खाणं सुरु आहे, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.
“विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
ज्या अजित पावारांनी राष्ट्रावादी पक्ष टिकवुन ठेवला. ज्या अजित पवारांनी तुम्हाला विधान परिषदेवर निवडून आणले. त्या अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाते. त्यांचा पराभव घडवुन आणला जातो. याचं आत्मचिंतण तुम्ही करा. भाजपचा विचार तुम्ही करू नका. तुमच्या गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत तुमचा दारून पराभव झाला. त्याचं चिंतण तुम्ही करा. भारतीय जनता पक्षाचा तुम्ही विचार करू नका. त्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, असं आवाहन भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ यांनी मिटकरी यांना केलं आहे.
चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती
तसेच, गोपीनाथ मुंडे यांचं राजकारणात, समाजकारणात एक वेगळी ओळख आहे. जरी ते वेगळ्या पक्षात असतील तरी त्यांच्याशी संबंध चांगले होते. जरी वेगळ्या पक्षात राहिलं तरी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजे. परंतु महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ते आज दिसत नाही. अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केलं आहे. ते चांगलचं आहे. पंकजा मुंडे आल्या तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. तसेच त्या कुठल्याही पक्षात राहिल्या तरी आम्हाला आनंद आहे. तसेच त्या कर्तृत्वान असून त्यांच्यावर कोणीही जबाबदारी दिली तर त्या पुर्ण करतील, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Read also
- “राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही”; गुलाब नबी आझाद
- “राष्ट्रवादीकडे अनेक जण आकर्षित, काही राज्यात भाजपची सत्ता गेलीय, त्यामुळे जोमाने काम करा”
- “पुन्हा मंत्रिपदापासून पानटपरीवर चुना लावायला बसावे लागेल”; गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादीचा टोला
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज