वर्धा : शरद पवारांनी मोठ्या आग्रहाने वर्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी केली. अन् कॉंग्रेस पक्षानेही मोठे मन दाखवत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडली. उमेदवार शोधत असताना अमर काळे हे सर्वात योग्य उमेदवार होते. म्हणूनच त्यांना संधी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता अमरबाबूंना दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. असे म्हणत कुटुंब म्हटले तर भाड्याला भांडे लागणारच हे होत असताना आपल्या एकजुटीने काम करायचे आहे. असं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय.
हेही वाचा…ठरलं तर मग…! राम सातपुते की प्रणिती शिंदे लढतीत ‘या’ समाजाची मतं गेम चेंजर ठरणार
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज देशाची परिस्थिती प्रचंड वाईट आहे, लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. दिल्ली आणि राज्यातील लोक नाराज आहेत आणि लोकांना या सरकारला धडा शिकवायचा आहे. यश मिळणार नाही म्हणून पडेल ती किंमत मोजायची, नितीमत्ता वेशीवर टांगायची, एखाद्याला टार्गेट करायचे, त्याला नामोहरम करायचे आणि शेवटी त्याला पक्षात घ्यायचे. २०१४ साली स्वच्छ कारभार करण्याचे आश्वासन देत होते आज त्यांच्याच पक्षात सर्व भ्रष्टाचारी लोकं आहेत.
फोडाफोडी करून आपली खुर्ची टिकवणे हे महाराष्ट्र आणि देशाला कदापि सहन होणार नाही. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे त्यांचे उमेदवार ठरत नाही. याचा अर्थ सत्ताधारी विचलित झाले आहेत. आत्मविश्वास पूर्ण ढासळला आहे. म्हणून बी पार्ट्यांना पुढे केले जात आहे. या बी टीममुळे यांचं फावतं. प्रत्येक मतदारसंघात हे खेळ खेळले जातील पण तुम्ही त्यांना उघडे पाडा. असा इशाराही त्यांनी दिलाय.
तसेच आज पवार साहेबांनी काय केले हे विचारले जात आहे. महाराष्ट्रासाठी पवार साहेबांनी काय केले हे सांगायला दिवस अपुरा पाडेल. पण अमित भाई, पवार साहेबांनी गुजरातसाठी काय केले हे नरेंद्र मोदी यांना विचारा. हे मूळ प्रश्नावर बोलत नाहीत. असा टोलाही जयंत पाटलांनी भाजपला लगावला. तसेच तिन्ही पक्ष एकत्र बसा, रणनीती ठरवा आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचा. २५-३० हजार मताधिक्य हिंगणघाट मधून द्या. तुम्ही ग्राउंड लेव्हलवर काम केले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…नरेंद्र मोदी की राहुल गांधी, आगामी पंतप्रधानांबाबत पुणेकर नेमकं काय म्हणतात?
हेही वाचा…“राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही..” सुनील तटकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान