IMPIMP

कंगना भाजपच्या संपर्कात आहे का ? फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

 

नवीदिल्ली : या सरकारला आता करोना नाही कंगनाशी लढायचं आहे असं वाटतंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यांना कोणती चौकशी करायची आहे ते करु शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे. पण कुठेतरी गांभीर्याने करोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करु वैगेरे सुर आहे त्यापेक्षा जास्त करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यातील ५० टक्के क्षमता तरी करोनाशी लढण्यात वापरा, कदाचित लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कंगनाशी भाजपचा संबंध नाही
महाराष्ट्रात रोज करोनाचा आकडा वाढत आहे. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. पण करोनासोबत लढायचं सोडून सरकार कंगनाशी लढत आहे,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. कंगना भाजपची बोली बोलते आहे असे विचारले असता कंगनाशी भाजपचा काहीही संबंध नाही असे फडणवीस यांनी म्हंटले. उलट शिवसेनेनेच कंगनाला मोठे केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली.राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं. तुम्ही जाऊन तिचं घर तोडलं,” असं म्हणत फडणवीसांनी कंगना भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप फेटाळला आहे.

Read Also

 

‘करून दाखवलं’म्हणत निलेश राणेंची शिवसेनेवर टोलेबाजी