मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच याची तक्रार करूनही पालिका आयुक्त आणि ठाकरे सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने महापौरांची चौकशी करून पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती.
अशातच कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषेद बोलताना म्हणाले की, “सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए आणि मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. एवढंच नाही तर महापौरांनी बनावट सह्या करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
Read Also :
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’ : महापौर किशोरी पेडणेकर
आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; नीलम गोऱ्हेंचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले
“थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका; सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या “