मुंबई : बिहारमध्ये ‘शवसेनेने’ आपल्या सहकार्यांचे मुडदे पाडलेत अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. अमृता यांनी आपल्या ट्वीटमध्ये शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केला होता.
आता त्यावर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, “एका शब्दाचे महत्व असतं. अमृता या नावातील ‘अ’ या अक्षराचे भान महत्वाचे आहे. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका.”
#शिवसेना # एका शब्दाचे महत्व असते.*
*#अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे*
अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत,शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही,आपल्या नावातील"अ"मृतावस्थेत जावू देवू नका,मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा २ @fadnavis_amruta pic.twitter.com/ZE74uqEPjH— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट करुन अमृता फडणवीस यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “अमृताताई या दिपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नका. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा मनस्वास्थ चांगले राहते.
Read Also :
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले
“थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका; सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या “