चेन्नई : नागपूरचे निक्करवाले तामिळनाडूचे भविष्य ठरवू शकत नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला आहे. पुढील काही महिन्यात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि संघावर सडकून टीका केली.
आम्ही नरेंद्र मोदींना भारताचा पाया उद्धवस्त करू देणार नाही. त्यांच्या लक्षात येत नाहीये की तामिळनाडूचे भविष्य हे केवळ येथील तामिळ लोकच ठरवू शकतात. राज्याचे भविष्य नागपूरचे चड्डीवाले ठरवू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर हल्ला चढवला आहे. ते तामिळनाडूच्या धारापूरम येथे बोलत होते.
#WATCH | We'll not allow Narendra Modi to destroy the foundation of India…He doesn't understand that only Tamil people can decide the future of Tamil Nadu. 'Knickerwallahs' from Nagpur can never ever decide future of the state: Congress' Rahul Gandhi in Dharapuram, Tamil Nadu pic.twitter.com/KFDaXKeTMG
— ANI (@ANI) January 24, 2021
तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
त्याआधी तिरुपूर येथे जनतेला संबोधित करताना देखील गांधींनी आरएसएसवर टीका केली होती. महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता, असे म्हणत त्यांनी संघावर टीका केली होती.
Read Also :
- ‘भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच धडा शिकवू’, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा इशारा
- ‘राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली’
- गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
- ‘पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव’ शिवसेना नेत्याचा थेट पवारांवर निशाणा
- ‘रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे वाचाच’