कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखरकारखान्याची निवडणूक लढत दुरंगी होणार की तिरंगी होणार याची उत्सुकता आता सर्वच सभासद आणि सत्ताधारी तसेच विरोधी पॅनल ला लागली आहे. ३ जून आधी संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांच्यात मनोमिलन होणार कि नाही हे स्प्ष्ट होणार आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण,राज्यमंत्री विश्व्जीत कदम व जिल्हापरिषद सदस्य ऍड. उद्यसिंह पाटील उंडाळकर यांनी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काठावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार यावर खलबत चालू होतं. आज मात्र विरोधी गटातील संस्थापक पॅनलच्या वतीने कारखान्याचे नेते अविनाश मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजूनही अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात समेट होतो न होतो तेच अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते,सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम,विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह ८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सत्ताधारी डॉ. सुरेश भोसलेंच्या विरोधात डॉ. इंद्रजित मोहिते आणि कारखान्याचे माजी चेअरमन ,संस्थापक पॅनल चे अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी सध्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत बैठक चालल्याने अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ काही संपता संपेना असे काही झाले आहे.
मनोमिलन होयच्या आधी रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते आणि संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते यांनी आपल्या परीने सभासदांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सुरु केलेले आहे. एकत्रीकरणाचा जरी सत्ताधिकाऱ्यांचा डाव असला तरी देखील दोन्ही नेत्यांकडून मात्र एकमत होत नाहीये अशी खबर सूत्रांनी सांगितली आहे. ३ जूनच्या आत काहीतरी निर्णय दोन्ही गटांना घ्यावा लागणार आहे. जर मनोमिलन झाले तीनही तर कृष्णा सहकारी साखर कारखान्यात तिरंगी लढत बघायला मिळणार हे निश्चित आहे.