मुंबई : कुंभकर्ण आज असता तर आमच्यापेक्षाही कोणी मोठा भाऊ आहे हे पाहून आत्महत्या केली असती, असं म्हणत माजी अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला. २८ नोव्हेंबर रोजी राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालं.
असं असलं तरी विरोधकांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, मराठा आरक्षण, वीजबिल अशा मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका करण्याचे प्रयत्न केले आहेत. मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला.
जेव्हा मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो त्यात ‘यू’ या अक्षरावरून नाव सुरु होतं आणि अदिती तटकरे यांचं ‘ए’ वरून सुरू होणारं नाव अखेरचं येतं तेव्हा बाराखडी जशी उलट सुरू झाली तसं यांचं कामही उलटं झालं. गेलं एक वर्ष उलटसूलट काम करणारं सरकार आपण अनुभवतो आहोत, असंही मुनगंटीवार म्हणाले.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं लोकमान्य टिळकांचं वाक्य सर्वांच्या परिचयाचं आहे. परंतु आज आपण जेव्हा सरकारचे निर्णय पाहतो तेव्हा सरकार डोकं ठिकाणावर आहे का हे खरंच आहे, परंतु सरकारच ठिकाणावर आहे का असा प्रश्न टिळक आज असते तर विचारला असता असं मुनगंटीवार म्हणाले.
मुलाखतीतलं त्यांचं भाष्य ऐका. आर्यभट्टानं शून्याचा शोध लावला. इतिहारासत नोंद झाली पण राज्य सरकार कार्यशून्य आहे. जे काही करेल ते केंद्र सरकार करेल असा शोध केंद्रानं लावला, असंही मुनगंटीवार म्हणाले.
“प्रत्येक मंत्री आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम दिली नसल्याच्या बोंबा मारत आहे. वीजबील माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे दिले पाहिजे अशी मागणीही केली जात आहे. तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या. तुमचं काम काय?, असा प्रश्नही त्यांनी केला.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा