पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला तब्बल १५ दिवसानंतर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी चेन्नईत पकडलं. त्यानंतर त्याला मुंबईतील अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. त्याआधी ससूनमधून पळून गेलो नाही तर पळवून लावलं आहे. यामध्ये कोण कोणाचा हात आहे, ते सर्व सांगणार, असं धक्कादायक विधान ललित पाटीलने केलं आहे. त्यावरून आता या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटीलला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी केलीय.
हेही वाचा…ड्रग्ज माफिया ‘ललित पाटला’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा होता आशीर्वाद?
ललित पाटील याचा तुरूंग ते पंचतारिख हॉटेल असा गेल्या काही दिवसापासून प्रवास सुरू होता. आज पुणे शहर अमली पदार्थाच्या बेडीत अडकलं आहे. त्यामध्ये अनेक तरूण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. ललित पाटीलचा व्यवसाय हा फक्त पुण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. यातच ललित पाटील यांच्याशी आजी माजी पोलिस आयुक्तांशी संबंध आहे. असे अनेक ललित पाटील सध्या महाराष्ट्रात वावरत आहेत. त्यामुळे या ललित पाटीलला भर चौकात फाशी दिली पाहिजे. अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केलीय.
हेही वाचा…काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर, 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार
ललित पाटील फरार झाल्यानंतर तो इकडे तिकडे फिरत होता. परंतु त्याला अटक केल्यानंतर तो जळगाव, चाळीसगाव आणि धुळ्यालाही येऊन गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये तो तीन दिवस राहिला होता. याची एक बातमी आली आहे. जळगाव, धुळ्याला तो कशासाठी आला होता ? नाशिकमध्ये पालकमंत्री असताना त्याचे काही लोकांशी संबंध आलेत. असा आरोप केला होता. त्या आरोपाची आता पुष्टी होतेयं. अस राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणात आता चौकशी होणार, वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी ललित पाटील यांच्याबाबत मोठी भीती व्यक्त केली आहे. ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये. असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तर ललित पाटीलला जर अटक करण्याचं श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय त्यांना घ्याव लागेल. ललित पाटीलला आम्ही अटक करू अस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तर मग त्यांना माहिती होती का ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थितीत केलं आहे. या सगळ्याच गौडबंगाल नेमक काय आहे. दादा भूसेंचा वरदहस्त असल्याशिवाय हे होत का ? कारखाना कसा उभा राहतो? असा खोचक सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थितीत केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, मग अजित पवार गटाला किती जागा मिळणार ?
हेही वाचा…“ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये, ‘या’ मोठ्या नेत्यांनी व्यक्त केली भिती”, प्रकरणात मोठ्या मंत्र्यांचा संबंध?
हेही वाचा…काकांचा सल्ला ऐकला…! ४० वर्षांपासूनचा राष्ट्रवादीचा निष्ठावंत माजी आमदार परतला