मुंबई : सर्वोच्च न्यायालायने काल ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला आता राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता राज्यात लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थामधील महापालिकेतील निवडणुकांसर्दभात भाजपकड़ून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
मी आज मुख्यमंत्री नसलो तरी…; OBC आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
महाविकास आघाडी सरकारने पुणे आणि इतर ठिकाणी प्रभाग रचना ही 3 सदस्य़ांची करण्यात आली होती. सदर रचना करताना अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सोयीची रचना केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आणि अनेक नागरिकांनी कोर्टात देखील धाव घेतली. आता ओबीसी आरक्षणाच्या पाश्वभूमीवर नव्याने आरक्षणाच्या सोडती काढव्या लागणार आहेत. असंही भाजपने म्हटलं आहे. ओबीसी समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ नये याची जबाबदारी शासनाची आहे. तरी विद्यामान 3 सदस्यांची प्रभाग रचना रद्द करून 4 सदस्यांची नवीन प्रभाग रचना करावी व नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार नव्याने ओबीसी, महिला व अनुसुचित जाती जमातीच्या आरक्षण सोडती काढव्यात अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? आज ठरणार देशाचा 15 वा राष्ट्रपती कोण? वाचा सविस्तर
महाविकास आघाडी सरकारच्या वेळी 3 सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली होती. यामध्ये पुण्यात राष्ट्रवादीने तर मुंबईत शिवसेनेने आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना केल्याचा आरोप काॅंग्रेससह भाजपने देखील केला होता. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे युतीचे सरकार आल्याने प्रभाग रचनेत आता मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपचे पुण्याचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.
“ओबीसी समाजाच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने जिंकल्याचं समाधान”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता आगामी काळात नगरपरिषदा आणि नगरपंचायती सोबत महापालिकेच्या निवडणुका देखील लवकरतच लागण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पावसाचं वातावरण असल्याने सप्टेंबर महिन्यात या निवडणुकांचा कार्यक्रम घेतला जाईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “जर झगडे या आयोगात नसते तर यांनी ओबीसींची कत्तल केली असती”
- “बावनकुळे साहेब…आपण स्वप्नात राहू नका”; अमोल मिटकरींचा बावनकुळेंना टोला
- “फडणवीस हे बालिशच आहेत, सत्तेसाठी आसुरलेले नेते”; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर हल्लाबोल
- भाजपच्या 4 आमदारांची आर्थिक फसवणुक करणारा पोलिसांच्या ताब्यात
- “राऊतांना राष्ट्रवादीत जायचं आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडली”; रामदास आठवलेंचं वक्तव्य