जळगांव : मागील आठवड्यात जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. यामध्ये जेष्ठ हाच ष्रेष्ठ हेच सिद्ध झाले आणि एकनाथ खडसे यांनी विरोधी पार्टीला चारी मुंड्या चीत केले.
नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल; प्रविण दरेकरांचा टोला
या पराभवानंतर गिरीश महाजन यांनी सल व्यक्त केली आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोबत एकत्र निवडणूक लढवण्याच सांगत आम्हाला गाफील ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने ऐनवेळी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यामुळेच भाजपला पराभव स्वीकारावा लागला अशी खंत भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित महाविकास आघाडीतील नेत्यांनी वेळेला पलटी मारली आणि आमचा गेम केला असही महाजन म्हणाले. ते औरंगाबाद येथील भाजपच्या पक्ष कार्यालयातून बोलत होते.
‘त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
पुढे बोलताना महाजन यांनी एकूण एक घडामोडींची आपबीतीच सांगितली. महाजन म्हणाले की, निवडणुकीपूर्वी आमच्या सर्वांच्या तीन बैठका झाल्या आणि निवडणूकबिनविरोध करायची असे ठरलं. त्यानंतर कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हे पण ठरलं आणि आमच्या वाट्याला सात जागा आल्या. त्यानंतर सर्वांनी सात-सात फॉर्म भरायचं असे निश्चित झाले.
राज्यात पुन्हा निर्बंध लागू, सरकारची नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर…
मात्र फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी जिल्हा बँक निवडणुकीत युती करायची नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मी अजित पवारांना बोललो तर खालचे लोकं आपलं ऐकत नसल्याचे ते म्हणाले. तर खालचे लोकं वरचे आयकत नसल्याचे म्हणाले. त्यामुळे आम्ही गाफील राहिलो आणि पराभव स्वीकारावा लागला, असे महाजन म्हणाले. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकहाती विजय पाहायला मिळाला होता. एकूण २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, आणि २ जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
Read Also :
- चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय हायकमांड नाराज, महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात अपयशी – सूत्र
- महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
- महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
- संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई; राज्यात ९३७ बसेस धावल्या रस्त्यावर
- ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम : ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती