मुंबई : २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. सत्तेच्या चाव्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घेतल्या होत्या. अजित पवारांनी थेट बीजेपीकडं जाऊन या सगळ्या चाव्या आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय चाणक्य शरद पवारांनी सर्व मनसुबे धुळीला मिळवत थेट महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक
होय, आज महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मोठ्या राजकीय नाट्यानंतर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ठाकरे सरकारनं राज्याची धुरा सांभाळली होती. आज दोन वर्षपूर्तीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहित राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
ठाकरे सरकार आलं आणि कोरोनाची महामारी देखील आली. ठाकरे सरकारची दोन वर्ष ही कोरोनाच्या महामारीतच गेली. मुख्यमंत्री म्हणाले की, “सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं, नियोजनबद्ध रितीनं मुकाबला करण्यात गेला. मात्र जगाला संकटात टाकणाऱ्या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता, आपल्या सरकारनं वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमानं काम करायला सुरुवात केली.
भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
आपल्यावर आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर केलं, हे आपणा सर्वांच्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसंच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढ्यात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यात देखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत.
एसटी आंदोलन पेटले; शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, बसचालक जखमी
उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी कोरोनाच्या काळात आपली कामे चोख पाडली आहेत. नवनवीन योजना देखील या संकटकाळात राबविण्याचे काम सरकारने केले आहे. मला खात्री आहे, या दोन वर्षांत आपलेपणाची नाती रुजली, जसे काम केले तसेच पुढेही होत राहावे आणि आपला विश्वास अधिकाधिक मिळावा, असेही मुख्यमंत्री आपल्या पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.
Read Also :
- संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई; राज्यात ९३७ बसेस धावल्या रस्त्यावर
- ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम : ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती
- राज्यात पुन्हा निर्बंध लागू, सरकारची नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर…
- ‘त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
- नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल; प्रविण दरेकरांचा टोला