अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केल्यानंतर शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत: होऊन संप मागे घेत सेवा सुरू केल्यानंतरही ही दगडफेक कोणी केली असावी याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी यासंबंधी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडे बोट दाखविले आहे. बस सुरू होत असल्याने पंधरा-वीस दिवस त्यांचा तेजीत असलेला व्यवसाय बंद पडण्याच्या भीतीने त्यांच्यातील काही मंडळी हे कृत्य करीत असल्याचा कर्मचाऱ्यांना संशय आहे.
कोल्हापुरातील आगामी राजकीय समीकरणे घडणार महाडिक विरुद्ध पाटील लढतीतून
परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर शुक्रवारी शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेऊन सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. बससेवाही सुरू करण्यात आली. नगर जिल्ह्यात केवळ या एकाच आगारातील संप मिटला आहे. मात्र, काही काळातच बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या.
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश
शेवगाव ते नगर बसवर (क्रमांक एमएच ४० वाय ५४२८) तालुक्यातील अमरापूरजवळ दगडफेक झाली. अज्ञात व्यक्तीने पाठीमागील बाजूने दगड मारल्याने बसची मागील काच फुटली आहे. तर शेवगाव-श्रीरामपूर बसवर (क्रमांक एमएच ४० एन ८८९५) सौंदळा (भेंडा नेवासा) येथे दगडफेक झाली. शेवगाव-पैठण बसवर (एमएम ४० एम ८७५२) दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी याची नोंद घेतली आहे. घटनास्थळीही पोलीस तात्काळ दाखल झाले. बससोबतही बंदोबस्त देण्यात येत आहे.
संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत
शेवगाव आगरातील कर्मचाऱ्यांनी स्वत: होऊन संप मागे घेतला आहे. संप मागे घेताना एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप लबडे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. ‘भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कामगारांना चिथावणी देऊन आंदोलन पेटविले. त्यानंतरही सरकार ऐकत नाही, असे लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते संपातून निघून गेले,’ असा आरोप त्यांनी केला होता. त्यासोबतच सरकारवरही त्यांनी आरोप केला होता. ‘राज्य सरकार भेदभाव करीत आहे. ४१ टक्के पगारवाढ सरसरकट सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यात वर्गवारी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती झाली आहे. न्यायालयाचा अवमान होऊ नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये याचा विचार करून कर्मचारी स्वत: होऊन संप मागे घेत आहेत. मात्र आमच्या मागण्यांसाठी लढा सुरूच राहील’, असे लबडे म्हणाले होते.
Read Also :
- भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
- नवाब मलिक यांची भूमिका ड्रग माफियांसाठी फायदेशीर ठरली; निलेश राणेंचा सनसनाटी आरोप
- मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
- एसटी संप फुटला आहे या निव्वळ अफवाच; संजय राऊत, शरद पवारांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल
- संप मागे घेतला तरच एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार; अनिल परबांचा कामगारांना इशारा