कोल्हापूर : भविष्यात पंधरा वर्षे राज्यात आपणच आहोत असा विश्वास कोल्हापूरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीचा मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी ही मंडळी एका मंचावर आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेने कडून दगाबाजी होणार नाही हा शब्द संपर्क प्रमुख मी देतो असे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी म्हटले. अरुण लाड,जयंत आसगावकर यांचा विजय एकतर्फी आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पदवीधर आणि शिक्षकांना न्याय मिळवून देतील. सरकारने शिक्षण क्षेत्रांत चांगलं काम करायचा प्रयत्न केल्याचे सामंत म्हणाले.
मागील काळात अनेक आदेश काढले आणि मागे घेतले गेले. या निवडणुकीत भाजपवाले जेवढ खोट बोलता येईल तेवढं बोलून आपलं दुकान चालवत आहेत. अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मागच्या पाच वर्षात सरकारने ६७ जीआर काढले गेले आणि नंतर ते मागे घेतले. ते का घेतलं या सांगण्याची गरज असल्याचा टोला उदय सामंत यांनी भाजपला लगावला.
पदवीधर मतदार संघात मागील काही वर्षांत फक्त घोषणा झाल्या. आमचं सगळं व्यवस्थित ठरलं असेल तर भविष्यात पंधरा वर्षे राज्यात आपणच आहोत असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला. तसेच कोकणातील लोक जेव्हड वाईट बोलतात तेवढं आमच चांगलं होत असा टोला त्यांनी नारायण राणेंना लगावला.
Read Also :
हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणून ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला नाही: देवेंद्र फडणवीस
मोदी सरकारने ‘सीबीआय’ची पानटपरी केली आहे, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची टीका
तृणमूल काँग्रेसचे ५ खासदार भाजपप्रवेशाच्या तयारीत, ‘या’ भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
…म्हणून आमदार रोहित पवारांनी शाळकरी मुलांना धीर देत दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री ठाकरेंना बॉलिवूडची तर आदित्य ठाकरेंना पब,बारची चिंता, आशिष शेलार बरसले…