नवीदिल्ली : आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अधिवेशनासाठी आलेल्या खासदारांना मास्क, सॅनेटायझर्स, कोविड किट देण्यात आलं. आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातल्या करोनाच्या स्थितीबाबतही लोकसभेत माहिती दिली. भारतात करोना संसर्गाचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी झालं आहे असं त्यांनी सांगितलं.
लोकसभेचं कामकाज मंळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजल्यापासून राज्यसभेचं कामकाज सुरु होईल. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं आश्वासन लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी दिलं. करोनाकाळात आपण हे पावसाळी अधिवेशन घेतो आहोत. अशा वेळी देशातील परिस्थिती समजून घेत योग्य ते सहकार्य करावं असंही आवाहन ओम बिर्ला यांनी लोकसभेत केलं.
Lok Sabha adjourned till 3 pm tomorrow. pic.twitter.com/3DmOf4iata
— ANI (@ANI) September 14, 2020
प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, असा प्रस्ताव आज सकाळीच पास झाला. सरकारला प्रश्न विचारण्याचे इतरही पर्याय आहेत. सरकार चर्चेतून पळ काढत नाही असंही लोकसभेत स्पष्ट करण्यात आलं. दरम्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शून्य प्रहरात सरकारला प्रश्न विचारले जाऊ शकतात असा सल्ला दिला आहे.