मुंबई – विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयातील अनुपस्थितीवरुनही विरोधक नेहमीच त्यांच्यावर निशाणा साधत असतात. त्यातच आता खुद्द शिवसेनेच्या आमदारानेच मंत्रालयात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे.
शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत बोलताना आठवड्यातील एक दिवस तरी मंत्र्यांनी मंत्रालयात उपस्थित राहावं अशी मागणी केली आहे. तसंच ही आमदारांच्या मनातील खदखद असून कुठेतरी बोलून दाखवावी लागेल असंही म्हटलं.
“मागील दोन वर्षांपासून सत्तास्थापन झाल्यानंतर विविध लोकप्रतिनिधी दर बुधवारी मुंबईला मंत्रालयात येतात. दिवसभर काम करुन संध्याकाळी परत जातात. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवदेनासंदर्भात, पत्रावर काय कारवाई झाली याची माहिती मिळण्याची काही ऑनलाइन सोय नाही. अडचणींमुळे अधिवेशनाचे दिवसही कमी झाले आहेत. जनतेचे सर्व प्रश्न मांडता येत नाही,” असं यावेळी ते म्हणाले.
५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
पुढे बोलताना त्यांनी मंत्रालयात दर बुधवारी काही विशिष्ट मंत्रीच दिसतात. जर लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा संपर्कच होत नसेल तर काय करावं? अशी विचारणा केली. “करोनाच्या स्थितीत समजून घेऊ शकतो. मग अजित पवार कसे काय रोज मंत्रालयात दिवसभर थांबतात? कसे लोकांना भेटतात?,” असं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.“ही आमदारांच्या मनातील खदखद असून कुठे तरी व्यक्त करावी लागेल. राज्य शासनात काम करणारे लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर सरकारने किमान बुधवारी सर्व मंत्र्यांना मंत्रालयात उपलब्ध राहण्यास सांगावं अशी विनंती आहे. अन्यथा आमदारांची अडचण होते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Read also:
- ‘रेसिडेन्सिअल कॉरीडोर ते इंडस्ट्रीअल कॉरीडोर’ वाहतूक नियोजनासाठी पूर्णवेळ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा : महेश लांडगे
- धक्कादायक..! अधिवेशन सुरु असताना विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
- राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती
- “अजितदादा, तुम्ही शेजाऱ्यांचे अनुकरण करा!”; सुधीर मुनगंटीवार यांनी साधला निशाणा
- महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही – अजित पवार