मुंबई : यूपीतील लखीमपूर येथे झालेल्या हिसंक चकमकीचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीतील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक चकमकीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर खेरी येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, त्याआधी तेथे गोंधळ झाला. एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट, कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही; राष्ट्रवादीच्या गौप्यस्फोटाने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी टीकोनिया पोलीस स्टेशनमध्ये अजय मिश्रांचा मुलगा आशिष यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. आरोप करण्यात आला आहे, की जेव्हा शेतकरी निषेधासाठी गेले होते. त्याचवेळी कारने त्यांना उडवले. या दरम्यान, ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी आशिष मिश्रा यांच्यासह १४ जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी त्यांचा मुलगा आशिष मिश्रा गाडी चालवत असल्याचा आरोप फेटाळला आहे. अजय मिश्रा यांनी काही समाजकंटकांना दोष दिला आहे.
Read Also :
- नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का: काँग्रेसला घवघवीत यश, राष्ट्रवादीला मात्र दोनच जागांवर मानावे लागले समाधान
- मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले
- संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट, कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही; राष्ट्रवादीच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- अमोल मिटकरींना मोठा धक्का: गावातच झाला पराभव, बच्चू कडू यांच्या प्रहारचा फटका
- अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची मुसंडी; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी गेली कोमात