पंढरपूर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून महाराष्ट्रात मराठा संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आज आहे. त्यातच आज मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्री बंगल्यावर आंदोलन करण्याचं नियोजन आखलं आहे. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा प्रतिकात्मक मशाली घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजेच मातोश्रीवर धडकणार आहे.
संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पंढरपुरात मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाल सुरुवात होणार आहे. या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही मोर्चांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा ठोक मोर्चाच्यावतीने आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. तर पंढरपुरच्या दिशेने येणारी एसटी वाहतूकही थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुमारे 500 पोलीस तैनात असून ड्रोनद्वारे हालचालींवर नजर ठेवली जाईल. दुपारी एक वाजता नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. प्रशासनासोबत काल (6 नोव्हेंबर) रात्री उशिरा झालेल्या चर्चेतून एक प्रस्ताव तयार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार मोजक्या 10 ते 15 आंदोलकांना नामदेव पायरीचे दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पायी आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल.
Read Also –
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘या’ नेत्यांना विधानपरिषदेवर संधी
“राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते यादी नाकारणार नाही”
अखेर यादी समोर आली! महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी ‘या’ 12 नावांचा प्रस्ताव
‘काल निवडून आलेला पोरगा संसदेत 12 वेळा बोलला आणि 3 टर्म खासदार…’ अमोल कोल्हेंचा आढळरावांना टोला