तुकाराम मुढेंची बदली झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याचदरम्यान तुकाराम मुंढेंची बदलीवर ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी देखील आपले मत अवघ्या चार शब्दात मांडले आहे. ‘बदल्या करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार’ आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये नाराजी, राग आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून राष्ट्रवादीनं एकप्रकारे हात वर करण्याचा प्रयत्न केल्याचंच या प्रतिक्रियेतून जाणवतं.
तत्पूर्वी, तुकाराम मुंढे नागपुरात जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला रुजू झाले होते. अवघ्या आठच महिन्यात त्यांची बदली मुंबईला करण्यात आली आहे. त्यांची ही आठ महिन्यांची कारकीर्द एका अर्थाने वादळी राहिली आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बुधवारी आलेल्या बदलीच्या आदेशाने अनेकांना धक्का बसला आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले. त्यामुळे आता तुकाराम मुंढेंच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत.
Also Read This
ही केंद्राची जबाबदारी आहे . . जीएसटी परिषद बैठकीत अजित पवार कडाडलेhttps://t.co/gczKHIWy1V@AjitPawarSpeaks @NCPspeaks @AjitPawar4Mah
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 27, 2020