मुंबई – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहीमच उघडली आहे. सातत्यानं पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वानखेडेंनी चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवली, बोगस कागदपत्रांचा आधार घेतला, असे आरोप मलिक यांनी केले. त्यामुळे, वानखेडे विरुद्ध मलिक असा वाद रंगला आहे.
‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी एका कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. मलिक यांनी कुटुंबातील शिक्षणाच्या वातावरणाबद्दलही मनमोकळेपणे गप्पा मारल्या. आमच्यात एक म्हण आहे, कम पढा खर्चे जाए और जादा पडा तो घर से जाए.. असे आमचे वडिल म्हणत होते. त्यामुळे, घरात शिक्षणासाठी तेवढं अनुकूल वातावरण नव्हत. घरातून कॉलेज शिकणारा पहिला मीच होतो, त्यामुळे, कॉलेजला जाण्यासाठी मला स्कूटर होती, नंतर बुलेटही घेऊन दिल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच, राजकारणातील काही व्यक्तींचे आवडते गुण सांगताना, त्यांना काही सल्लेही दिले आहेत.
“कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
अजित पवार यांच्या कामाची स्टाईल मला फार आवडते. काम करताना ते कधीही थकत नाहीत. तसेच, सगळं अगदी स्पष्टपणे बोलतात, लोकांना ते वाईट वाटत असेल. पण, मला चागंलं वाटतं, असे मलिक यांनी म्हटले. तसेच, त्यांनी आणखी मनमोकळं झालं पाहिजे, केवळ कामच करुन चालत नाही. ते लोकांपर्यंतही पोहचवलं पाहिजे. ‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’ करायला हवा, असा प्रेमळ राजकीय सल्ला मलिक यांनी अजित पवारांसाठी दिला आहे. कारण, प्रेम केलं नाही तर नातं टिकणार नाही, आणि राजकारणात प्रचार केला नाही, तर लोकांना आपलं काम समजणार नाही, त्यामुळे, थोडं जास्त बोलायला हवं, असा सल्ला मलिक यांनी अजित पवार यांच्यासाठी दिला.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, संजय राऊतांचा जोरदार टोला
- अखेर रामदास कदम यांना ‘रामराम’; शिवसेनेतून सुनील शिंदे, बाजोरीया यांना उमेदवारी
- फडणवीसांचा ‘तो’ गुण चांगला; नवाब मलिक यांनी कौतुक करत मारला टोला
- ‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
- “आजची सकाळ मला अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”; संजय राऊत यांचे प्रतिपादन