मुंबई – केंद्र सरकारने मागील वर्षी संसदेत आपल्या संख्याबळाचा वापर करत शेतकऱ्यांच्या संबंधीचे तीन कायदे संसदेत मंजूर करून घेतले होते. या कायद्यांची अंमलबजावणी होण्याआधीच हे कायदे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. संसदेत या कायद्यांवरून मोठा गदारोळ माजला होता. खुद्द भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनीही त्यावेळी राजीनामे दिले होते. हे तिन्ही कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना रद्द केले होते. त्यानंतर मोदींवर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. मोदींना मित्र मानणाऱ्या काही लोकांनी देखील मोदींवर या निर्णयामुळे कडाडून टीका केली होती. आता शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींवर टीका केली आहे.
सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारनं पाय मागे घेतलाय; नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया
“ज्या पद्धतीने इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये भूमिपुत्रांना चिरडलं, तसंच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच आजची सकाळ मला अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की गेले वर्षभर शेतकरी बांधव आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करत होते. शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता मुक्त झालं आहे. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ती स्वातंत्र्याची व्याख्या कधी होऊच शकत नाही. आजचा जो सूर्योदय उजाडला आहे तो शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यापेक्षा काही कमी नाही.
एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार ही तर एक अफवा – माजी मंत्री सदाभाऊ खोत
“जसं पंतप्रधान मोदी सांगत होते तसं हे शेतकरी फक्त २-३ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होते. या शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे शेवटी सरकारला झुकावं लागलं. आता ३ काळे कायदे रद्द होत आहेत हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलं नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.’ असे संजय राऊत म्हणाले.
Read Also :
- सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप, खोतकर म्हणाले…
- रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम
- निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल
- वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट
- ‘पवार म्हणजे फक्त तडफड, त्यांना कुठेच जम बसवता आला नाही’; निलेश राणेंचे टीकास्त्र