औरंगाबाद – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; वादग्रस्त तीनही कृषी कायदे रद्द
या घोटाळ्याबाबतच्या आरोपांवर अर्जुन खोतकर प्रतिक्रया देत म्हणाले. “सोमय्या जे बोलत आहेत त्यांचा बोलाविता धनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर दिली. “किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली नाही तर घ्यायला लावली. मी साखर कारखाण्याचा मालक नसून भागधारक आहे. जर कारखाना शंभर कोटींचा असेल तर कारखाना मालकाला बोलून किरीट सोमय्या यांना हा कारखाना शंभर कोटीमध्ये द्यायला लावू. सोमय्या यांची पत्रकार परिषद पाहिली नाही. त्यांचा बोलविता धनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आहेत,” असे अर्जुन खोतकर म्हणाले
मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय – अमोल कोल्हे
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर हा गंभीर आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली. यामध्ये खोतकर यांनी दानवे यांचे नाव घेतले आहे. आता दानवे खोतकर यांना काय प्रत्यूत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम
- निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल
- वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट
- ‘पवार म्हणजे फक्त तडफड, त्यांना कुठेच जम बसवता आला नाही’; निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने’, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत