मुंबई : राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे, कोल्हापूर, चंद्रपूर, अकोला या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून खबरदारी घेत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना डावललं आहे.
देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस
कोल्हापूरमधून माजी आमदार अमल महाडिक, चंद्रपूरमधून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत खंडेलवाल, धुळ्यातून अमरीश पटेल, मुंबईतून चित्र वाघ यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत होते मात्र उमेदवारी राजहंस सिंह यांना देण्यात आली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात चित्रा वाघ यांच्या नावाला कात्री दिल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
महिला अत्याचार असो अथवा इतर मुद्दे असो, कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवरटीकेचा आसुड सोडण्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ एकही संधी सोडत नाही. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता त्यांच्याच पक्षानं पाणी फेरलं गेलं आहे. भाजपकडून मुंबई विभागातून राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे. चित्रा वाघ यांनी अलीकडच्या काळात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमकपणे बाजू मांडली होती. त्यामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते आणि राजीनामा द्यावा लागला होता.
‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
महिलांच्या मुद्यावर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक वेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. साहजिक चित्रा वाघ यांचं नाव विधानपरिषद आमदारकीसाठी पुढे आलं होतं. पण, ऐनवेळी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. ऐनवेळी दिल्लीत झालेल्या घडामोडींमुळेच चित्रा वाघ यांचा पत्ता कट करण्यात आला असं देखील बोललं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचा टक्का हा शिवसेनेच्या बाजूने असतो. त्यामुळे मराठी उमेदवार देण्याऐवजी भाजपने उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
Read Also :
- ‘पवार म्हणजे फक्त तडफड, त्यांना कुठेच जम बसवता आला नाही’; निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने’, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत
- एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा
- ‘पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसेल म्हणून मोदींनी कायदे रद्द केले’; शरद पवारांचा सणसणीत टोला
- “कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”