मुंबई : गुरुनानक जयंतीच्या शुभमुहूर्तावर काल (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना वादग्रस्त कृषी कायदे संसदेत माघार घेऊ अशी घोषणा केली. शेतकऱ्यांनी आता आंदोलन न करता आपापल्या घरी जावे, नवीन सुरुवात करावी आणि शेतीला लागावे असं देखील म्हटलं. आम्हीच कुठंतरी कायदे समजून सांगण्यास कमी पडलो हे देखील मोदींनी कबुल केलं.
“कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लेख लिहीत या निर्णयासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले आहे. गेलं वर्ष शेतकऱ्यांसाठी ‘काळं वर्ष’ ठरलं आहे. देशातील केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर थेट शेतकऱ्यांना गुलाम बनविणारे तीन कायदे संसदेत मंजूर केले. यावरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली.
अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना मोडणारे कायदे होत असताना गप्प बसणे शक्य नव्हते. यासाठी दि. २५ ऑक्टोबर २०२० ला देशातील शेतकरी नेत्यांची दिल्लीत बैठक झाली आणि मी, व्ही. एम. सिंग, हनन मौल्ला, शिवप्रसाद शर्माआदींची समिती गठित होऊन ‘संयुक्त किसान मोर्चा’ (एसकेएम)च्या माध्यमातून आंंदोलनाचे रणशिंग फुंकले. ‘एसकेएम’च्या माध्यमातून गेले वर्षभर सरकारविरोधात संघर्ष सुरूच आहे. आंदोलनाची धार नंतर नंतर तीव्र झाली. पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली मधून मोठा विरोधात वाढला. दिल्लीच्या सीमांवर ऊन, वारा, पावसात शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी ठाण मांडले. तरीही मोदींना काही पाझर फुटला नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा दुर्दवी प्रयत्न झाला. हे आंदोलन ‘शिखांचे’ आहे देखील सरकारनं म्हटलं होतं.
‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
आता त उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आदी राज्यांतील निवडणुका आहेत. त्यादृष्टीनेकेंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात शेतकरी नाराजीचा फटका बसू शकतो, हे स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे कायदे मागे घ्यायची मोदींनी तसवीस केली. हेच २६ जानेवारी २०२१ रोजी झालं असतं तर देशात एक चांगला संदेश गेला असता. ६६७ शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले नसते. मात्र निवडणुकांना समोर ठेऊन कायदे रद्द करण्यात आले असा संदेश जगभरात पसरला आहे हे मात्र नक्की असं राजू शेट्टी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
Read Also :
- वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट
- ‘पवार म्हणजे फक्त तडफड, त्यांना कुठेच जम बसवता आला नाही’; निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने’, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत
- एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा
- ‘पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसेल म्हणून मोदींनी कायदे रद्द केले’; शरद पवारांचा सणसणीत टोला