वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. यावरून आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार हे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ असल्याची टीका केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतही वाढीव वीज बिला बाबत निर्णय नाही. मुख्यमंत्र्यांची बोलची कढी बोलाचा भात… pic.twitter.com/U8OrsRrKOT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 13, 2020
अतुल भातखळखर म्हणाले की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील वीज बिल सवलतीबाबत निर्णय न घेणारे ठाकरे सरकार बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे. मात्र वाढीव वीज बिले हा लाकोंचा भ्रम आहे, हे उर्जामंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे सत्ताचा माज असल्याचे लक्षण आहे. त्यांचा हा माज येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता शॉक देऊन उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास असल्याचे म्हटले आहे.
जोपर्यंत लोकांना दिलासा मिळत नाही. 300 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होत नाही, तोपर्यंत भाजप आपले आंदोलन चालूच ठेवेल, असे ते म्हणाले.