मुंबई : राज्यात महामारीचा फैलाव झाला असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महामारीसाठी गुणकारी ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे.
लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 4, 2021
“लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात महामारीचे एकूण ४८,६२१ नवे बाधित रुग्ण सापडले असून, ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ५९,५०० रुग्णांनी यादरम्यान महामारीवर मात केली आहे. तसेच, राज्यात काल नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास १० हजारांनी जास्त आहे.