मुंबई – देशभरातील कोरोना परिस्थती यंत्रणा नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत. अशी टीका काँग्रेसकडून केली गेली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले असून हतबल झाले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.
सध्या देशामध्ये दरदिवशी 4 लाख पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झाल्याचे पाहायला मिळत आहे असे नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीबाबत आदेश देऊन मोदी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. मात्र केंद्र सरकार यामध्ये हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
फक्त भाषणे करणे, घोषणा करणे, वेळकाढूपणा करणे ही मोदी सरकारची भूमिका आहे. आम्हाला ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरचा वेळेत पुरवठा होत नाही, जवळ जवळ साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून हे मोदी सरकार अन्याय करतेय की, या सरकारला काम करता येत नाही, असा टोला मलिक यांना लगावला. दरम्यान लवकरात लवकर लस द्यावा, 50 टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.