मुंबई : जे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत, ते मैदानातून पळून गेले असून राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टिका केली. यावरून आता कॉंग्रेसच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
हेही वाचा…” ‘गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा,”पुण्यात कॉंग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
काल मोदी यांच्या संभ्रमावस्थेतील, घाबरलेल्या भाषणातून एक बाब पक्की झाली ती म्हणजे पहिल्या टप्प्यातील निकालात इंडियाचा विजय निश्चित आहे. मोदी जे बोलले ते HateSpeech तर नक्कीच आहे, पण या निवडणुकीत सर्वसामान्यांचा लक्ष वळवण्याचा जाणीवपूर्वक खेळलेला हा किळसवाणा डाव आहे. काल पंतप्रधानांनी तीच कृती केली जी त्यांना संघाच्या संस्कारांतून मिळाली आहे. असा घणाघात वर्षा गायकवाड यांनी केलाय.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सत्तेसाठी खोटे बोलणे, नको त्या गोष्टींचे खोटे संदर्भ देणे आणि विरोधकांवर खोटे आरोप लादणे, हे संघ आणि भाजपच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. पण देशातील १४० कोटी जनता यांच्या या लबाडीला बळी पडणार नाही. ही जनता ‘बनाम मोदी का परिवार’ अशी लढत आहे, जी जनता जिंकेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा….‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ नानासाहेब नवलेंचे सुनेत्रा पवार यांना प्रशस्तीपत्रक
काँग्रेसचा न्यायपत्र हा प्रत्येक भारतीयासाठी आहे. तो सर्वांच्या समानतेबद्दल भाष्य करतो. सर्वांना न्याय देण्याबाबत बोलतो. काँग्रेसचे न्याय पत्र हे सत्याच्या भक्कम पायावर ठाम उभे आहे. सत्य हेच आहे की, Goebbels रुपी हुकूमशहाची खुर्ची आता डळमळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. भारताच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा एवढी कमी केली नाही, जेवढी मोदीजींनी केली आहे. मोदीजी, जनता सगळं काही पाहत आहे.. त्यांना सर्वकाही कळत आहे.. याचे चोख प्रत्युत्तर मिळेल.. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर राजकारण सोडेन, “राणा जगजितसिंह पाटलांचं निंबाळकरांना खुलं आव्हान
हेही वाचा…“बारामतीसाठी शेवटचे सात दिवस राखून ठेवा”, अजितदादांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या सूचना
हेही वाचा…“पहिल्या टप्प्यात भाजपची सर्वत्र पिछेहाट, त्यामुळेच भाजपा निवडणुकीत बावचळली”