पुणे : आपल्या धर्माशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राम्हण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमुद आहे. मग ही विषमता आली कुठुन? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपुर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. असं वक्तव्य राष्ट्रीय स्वंय संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
“..तरी पाटील हिंदू धर्माच्या विपरीत कसे काय बोलले?” अंधारेंचा सवाल
नागपुर येथे भारतातील जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था यासंदर्भात त्यांनी भाषण दिलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर देखील भाष्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे. ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील वक्तव्याचे पुण्यातही पडसाद
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका जवळ आल्या की, अशी काही विधानं करणं आणि त्या वर्गाला चुचकारणं असं धोरण काही लोकाचं असू शकतं. या गोष्टींना जर बळ दिलं. तर मला खात्री आहे की मोहन भागवत भाजपच्या नेत्यांना यासंदर्भात लोकांना विश्वास वाटेल, अशी काही पावलं टाकायला सुचवतील. यातून ते जे भाष्य़ करतायत, त्याची अमंलबाजावणी होऊ शकेल. असा विश्वास देखील जयंत पाटलांनी व्यक्त केला.
Read also
- “भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”
- “दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
- “या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया
- “धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य
- नाशिक बस अपघात…! अपघातातील नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री