नागपूर : वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनी प्रकरणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या अडचणीत आले आहेत. यावरून ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर आता काॅंग्रेसच्या आमदारांनाकडून देखील अब्दुल सत्तार यांचा भ्रष्टाचार काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
“उद्धवजी, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा, बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका”
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या घोटाळ्याची 50 पेक्षा जास्त प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सत्तारांना इशारा दिला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना गायरान जमीन प्रकरण चांगलचं महाग जाणार असल्याचं दिसत आहे.
“अनिल देशमुख साहेबांची राजकीय कारकीर्द स्वच्छ … करारा जबाव मिलेगा”
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनी प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात यावर भाष्य केलं. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अब्दुल सत्तार यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. तसेच विरोधकांनाकडून सध्या अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Read also
- “एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात गुंडराज आणू पाहत आहे का ?” राष्ट्रवादीचा सवाल
- “रूपाली पाटलांनी पुराव्यासहित ती फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सोपविली, कारवाईची प्रतिक्षा “
- “तुम्ही आमच्या अंगावर शाई फेकली तर माझं काय होईल ?” अजित पवारांनी सभागृहातच व्यक्त केली भिती
- “तुम्ही 4 महिलांना संधी दिली, आम्ही त्यापेक्षा अधिक महिलांना संधी देऊ”; फडणवीसांचं सुचक वक्तव्य
- विदर्भ मजबूत , तर राज्य मजबुत…! मुख्यमंत्र्यांचं विदर्भसाठी खास पॅकेज जाहीर