नागपूर : विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोवीड परिस्थितीमुळे दोन वर्षानंतर हे अधिवेशन होत आहे. नागपुर ही केवळ राज्याची उपराजधानी नाही तर राज्याच्या प्रगती आणि विकासात खुप महत्वाचे योगदान देणारा जिल्ह्या म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच नागपुरला राजधानी मुंबईशी जोडणारा हिंदुह्यदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरू करून आम्ही उद्याच्या उज्वल भवितव्याचा महामार्ग खुला केला आहे. असंही ते म्हणाले.
“सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”
पुढे ते म्हणाले की, विदर्भ मजबूत , तर राज्य मजबुत होईल. देशासाठी जसा महाराष्ट्र तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ आहे. विदर्भाच्या संपुर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पुर्ण होऊ शकत नाही. नागपुर हे शहर लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा, याठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होणार आहे. नागपुर मेट्रो पहिला टप्पा लोकार्पण आणि दुसऱ्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे.
“शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारच्या फायली भाजपच पुरवतंय”, संजय राऊतांनी टाकला बाॅम्ब
नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार आहे. यामुळे मराठवाडा देखील जोडला जाईल. तसेच दक्षिण भारत थेट मध्य महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा 1 ला सुधारित 9279 कोटींच्या सुधारीत खर्चास मान्यता मिळाली आहे. वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 96 कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 548 कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे.
“शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली आहे. 70 हजार कोटीच्या रूपयांच्या गुंतवणुक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी विदर्भामध्ये एकून 44 हजार 123 कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात आली आहे. 45 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे 5 जिल्ह्यात 73 हजार हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यासाठी 98.58 कोटी निधी देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन सोजनेस गती देण्यासाठी 336 कोटी 22 लाख सुधारीत खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होईल. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रूपये निधी वितरीत करण्यात येणार आहे. अमरावती, नागपुर पुणे विभागातील 14 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रूपये वितरित करण्यात आली आहे.
Read also
- “उद्धवजी, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा, बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका”
- “अनिल देशमुख साहेबांची राजकीय कारकीर्द स्वच्छ … करारा जबाव मिलेगा”
- “तोपर्यंत तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या…! अजित पवार सभागृहातच संतापले”
- “उद्या सरकारमधील सर्वांत मोठ्या दरोडेखोराचं प्रकरण बाहेर येणार?”; विरोधकांचा कडक इशारा
- एकच भाऊ बच्चू कडू..! अधिवेशनास्थळीच पालीत राहून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनात बसले