नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयामधून मिळालेले २३ डिसेंबर २०२२ च्या पत्राद्वारे तारांकित प्रश्न सूचना क्र. 50419 राखून ठेवण्यात आला. तो आजच्या दिवशी ठेवण्यात आलेला आहे. असे पत्र राज्याच्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आले. परंतु आजच्या कामकाजात तो दर्शवण्यात आलेला नाही. त्यामुळे पॉईंट ऑफ प्रोशिजर प्रमाणे विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे राखून ठेवलेला प्रश्न दुसऱ्या आठवड्यात त्याच दिवशी ठेवण्यात येतो, असे सांगत विरोधी पक्षनेते अजितदादा यांनी पॉईंट ऑफ प्रोशिजरनुसार सभागृहात राखून ठेवलेला प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नामध्ये सरकारमधील मंत्री संबंधित आहेत. टीईटीमध्ये संबंधित मंत्र्यांच्या मुली तेथे शिक्षक म्हणून रुजू झालेल्या आहेत. आम्हाला कोणाला जाणीव पूर्वक टार्गेट करायचे नाही. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग करत असेल आणि स्वतःच्या घरातल्यांना लाभ दिला जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही, असे अजित पवार म्हणाले.
आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
यावर शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी प्रखर शब्दात टिका केली. तारांकित ठेवण्यात आलेल्या प्रश्नावर आज अजित पवार यांनी सवाल केला. तर हा प्रश्न निकषात बसत नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. परंतु हा प्रश्न निकषात बसेत नसेल तर राखून का ठेवण्यात आला ? असा सवाल करत मागील काही दिवसापासून आम्ही या सरकार विरोधात जी भ्रष्टाचाराच्या विरोधात घोषणा बाजी देत होतो. त्यावर आज शिक्कोमोर्तब झाला आहे. असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं
टीईटी प्रकरणात याच सरकारमधील एक मंत्र्यांच्यासंबंधित व्यक्ती अडकली आहे. त्यामुळे आमचा सरकार भ्रष्टाचारी नाही, म्हणून ह्या सरकारने यावर चर्चा करण्यास टाळली आहे. त्यामुळे आम्ही या विरोधात सभात्याग केला आहे. त्यामुळे हा अधिवेशन काहीच दिवसात गुंडाळणार असल्याचं आम्हाला समजत आहे. त्यामुळे या सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येणार आहेत. हे त्यांना कदाचित माहिती असेल. तसेच या सरकारमधील सर्वांत मोठा दरोडेखोर बाहेर येणार असून हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Read also
- एकच भाऊ बच्चू कडू..! अधिवेशनास्थळीच पालीत राहून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनात बसले
- “सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”
- “शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारच्या फायली भाजपच पुरवतंय”, संजय राऊतांनी टाकला बाॅम्ब
- “शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
- “अब्दुल सत्तार या रावणाची लंका दहन करून 2024 ला वनवासाला पाठवू”