नागपूर : पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण व शहरी भागातील तफावतीमुळे सर्वांना हक्काचे घर मिळत नाही. या विरोधात शिंदे सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्याच विरोधात आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतांना दिवसभर अधिवेशनात अन् रात्री अन् सकाळी ते आंदोलनात सहभागी होतांना दिसत आहेत.
अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं
केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेत, शहरी भागाला घरकुलासाठी 2 लाख 50 हजार रूपये मिळतात. तर ग्रामीण भागात मात्र घरकुलासाठी, फक्त एक लाख अठरा हजार दिले जातात. तसेच शहरी भागात दोनच निकष. तीन लाखांच्या आत उत्पन्न व जागेचे पीआर कार्ड, एवढ्यावरच घरकूल मिळो, ग्रामीण भागातील घरकुलासाठी मात्र 21 अटी लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही तफावत शासनाने दुर करणे आवश्यक असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट
दरम्यान, आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी पालघर येथे महामार्ग येथेच पाल ठोकून आंदोलन पुकारलं आहे. यावेळी त्यांनी आंदोलन कर्त्यांना चहा देखील बनवला. तसेच नागपुर येथील आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला. तसेच काल त्यांनी हा विषय अधिवेशनात देखील मांडला.
“स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
दरम्यान, शहरी व ग्रामीण भागातील आवास योजनेतील अनुदानात असलेली तफावत त्यांनी आपल्या आक्रमक भाषणातून लक्षात आणून दिली. शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रूपये मिळतात. दुसरीकडं गावात एक लाख 18 हजार रूपये मिळतात. एवढी तफावत आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे.
Read also
- “सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”
- “शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारच्या फायली भाजपच पुरवतंय”, संजय राऊतांनी टाकला बाॅम्ब
- “शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
- “अब्दुल सत्तार या रावणाची लंका दहन करून 2024 ला वनवासाला पाठवू”
- आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर