नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या मनात स्वतंत्र विदर्भ करण्याचा विचार होता. सुरूवातीचे चार वर्ष मुख्यमंत्री पद घ्यायचं अन् त्यानंतर स्वतंत्र विदर्भासाठी प्रस्ताव टाकायचा, असं देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होतं. असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
“राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी
मुख्यमंत्री झाल्या झाल्या. चार वर्षानंतर शेवटच्या सहा महिन्यात विदर्भाचा ठराव मांडायचा, अन् तेलंगणामध्ये झालं तसं महाराष्ट्रात मराठी भाषिकांचं दोन राज्य करायचं. अशी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात भावना होती. परंतु दुर्दैव आहे की, उत्तर महाराष्ट्राला अजूनही मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. असं म्हणत त्यांनी भाजप नेते गिरीश महाजनांवर शाब्दिक टिप्पणी केली.
“फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
अजित पवार सभागृहात बोलत असतांना गिरीश महाजांना उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री बनवा, असं म्हटलं गेलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, गिरीश महाजनांना आंतराराष्ट्रीय पातळीवर भाजपला वाढावयाला पाठवयंचं आहे. त्यांचे संपर्क फार मोठे आहेत. त्यामुळे ते झटपट काम करतात. असं सांगितल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकला.
Read also
- “जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
- दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा
- सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा
- मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?
- सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा