नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सीमावादाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातला ठराव विधीमंडळात एकमतानं मंजूर झाला. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा विधानसभेत निर्धार करण्यात आला. तसेच यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या भाषेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
“नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”
यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाच्या रेट्यापुढे सत्ताधारी पक्ष झुकला. कर्नाटक सीमावादावर विधानभवनात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. सीमाभागातील बांधवांच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीच्या इंचनइंच जागेवर महाराष्ट्राचा हक्क असल्याचा ठराव सदनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा नियम 110 नुसार कर्नाटकातील मराठी भाषिक (बेळगाव, कारवार, बिदर, बालकी, निपाणी) 865 गावातील इंच इंच जागा महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक सीमा प्रश्नामुळे वाद पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना शिंदे-फडणवीस बोटचेपी भूमिका घेत असल्याचा हल्लाबोल विरोधकांना केला. अखेर आज विधिमंडळात या प्रश्नावर ठराव मांडण्यात आला. तो एकमतानं मंजूर झाला.
Read also
- “राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी
- “फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
- “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”
- “सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”
- “गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन